Monday, August 1, 2016

दुर्ग संवर्धनातील आव्हाने!!!

ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनातील आव्हाने:
ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनातील आव्हानांबद्दल थोडक्यात सांगावयचे झाले तर; “दुर्गमता, लोकसहभाग, अनास्था, वेळ, आर्थिक बाबी, सातत्य, संघटन, जनजागृती, माहिती व प्रसारण, मर्यादा, कश्याप्रकारे आणि कश्याचे संवर्धन” अश्या शब्दांमध्ये मांडता येते. त्यात दुर्गसंवर्धनाची व्याप्ती बघता हे काम एकट्या दुकट्य़ाचे नाही तसेच एखाद्या शासकीय किंवा विनाअनुदानीत संस्थेचेही नाही. एखादा किल्ला निवडला असता त्याकिल्ल्याचे भौगोलिक स्थान, उंची, त्या प्रदेशाबद्दलची माहीती व इतिहास, त्याकिल्यावरील वास्तुंचा अभ्यास, वृक्ष आणि जंगल संपदा, वन्यजीव, किटक अश्या महत्वाच्या बाबींचा विचार आधी करावा लागतो. तसेच पर्यटनातुन असणारा लोकांचा रातबा अश्या गोष्टीं विचारात घ्याव्या लागतात. किल्ल्य़ावर संवर्धनामध्ये किल्ला हा एक केंद्रबिंदू म्हणुन पकडला असता त्याच्या भोवताली असलेल्या प्रदेशांचा अभ्यास असलेले व्यक्तींना एकत्र आणुन सर्व समावेशक आणि सर्वमान्य आरखडा बनवावा लागतो. किल्ल्य़ावरील एखादे पाण्याचे टाके स्वच्छ करावयाचे असल्यास त्या पाण्याची पत, त्यातील गाळ, त्यामध्ये असलेल्या ऐतिहासिक पुरावे देणारे वस्तू, त्या टाक्याची घनता / व्याप्ती असे सर्व बाबींचा विचार करावा लागतो. त्यामुळे आर्किओलोजी, जल तज्ञ, स्थापत्य तज्ञ अश्या लोकांचे मत घ्यावे लागते. अश्या गोष्टी पुर्णत्वाला जाण्य़ाकरता लोकसहभाग आणि सातत्य जरुरीचे असते. किल्ला म्हणला तर तो दुर्गम प्रदेशामध्ये असणार; एका दुर्गम प्रदेशामध्ये असल्याने तेथे जाऊन काम करणाय़ाची इच्छा असली तरी उमेद बरय़ाचदा लोकांच्यात रहात नाही. आम्ही संवर्धन उपक्रम राबवीत असलेले हे किल्ले मुख्यत्वे गिरीदुर्ग श्रेणीतले असल्याने तेथे पोहचणे आणि काम करणे म्हणजे मोठे आव्हान असते. बरयाचदा असे दिसुन आले आहे की अश्या एखाद्या उपक्रमांमध्ये सहभागी झालेला व्यक्ती अश्या कामांपासुन दुर जातो किंवा त्याच्यात सातत्य रहात नाही. ह्यामध्ये कोणाला दोष देऊन उपयोग नाही कारण हे कामच मुळी कष्टाचे आहे.
किल्ल्याला प्रत्येक सुट्टीच्या दिवशी भेट देणारे आहेत. काही एकटे येतात तर काही मोठ्याला संखेत येतात. त्यात वेगवेगळ्य़ा विचारांचे लोक येत असल्य़ाने त्यांच्याकडुन अनावधानाने किंवा जाणिव पुर्वक वास्तूंची छेडछाड होत असते. अश्या पर्यटनांतून बरय़ाचदा प्लास्टीक कचरा, वास्तूंची पडझड किंवा एखादा अपघात अशी आव्हाने उभी ठकतात. त्यासाठी आपण जात असलेल्या प्रदेशाचा अभ्यास त्याची दुर्गमता लक्षात घेण्याची गरज आहे. अश्या प्रकारचे पर्यटन करणारया बरय़ाच संस्था पुणे – मुंबई शहरात आहेत. पण त्यातुन सातत्याने दुर्ग संवर्धन मोहिमांमध्ये सहभागी होणारे लोक अगदी हाताच्या बोटावर मोजण्य़ा इतकेच आहेत. त्यांच्यातले कित्येक लोक आपण किती किल्ले सर केले, अमुकअमुक दिवसात ४-६ किल्ले अश्या प्रकारचे चढाओढ लावणारे दिसतात. पण एखाद्या किल्लावर संवर्धना करीता अनेकवार  जाणारया तुमच्या-आमच्यातील लोकांशी ते काय स्पर्धा करणार!! एकुण आपल्या ऐतिहासिक वास्तूंबद्दल असलेली अनास्थाच ह्यातुन दिसुन येते. अश्या नेहमी किल्ल्यांना भेटी देणारय़ा लोकांमधुनच किल्यावर चालेलेल्या कामात सहभाग होण्य़ाचे आव्हान सर्व संस्थांसमोर आहेते. किल्ल्य़ावर कामाला येणारा मनुष्य हा सर्वसामान्य नाहीतर अश्या दुर्गम प्रदेशांना नेहमी भेटी देणाराच आहे आणि हाच व्यक्ती हे काम करू शकतो असे माझे मत आहे. हे सदरहू काम शहरापासुन लांब असल्याने जाण्यायेण्य़ामध्ये आणि तेथे काम करताना येत असलेल्या श्रमसीमांमुळे हे काम दिर्घकाळ चालते. प्रत्येकजण आपापल्या कामांतुन वेळ काढुन येत असल्याने एखादी मोहीम ही दिर्घवेळ चालते. त्यात बरय़ाचदा सातत्य न राहिल्याने काम अर्धवट रहाते हे सत्य आहे. सिंहगडाचा आज जो विकास झाला त्याची मुख्य कारणे म्हणजे शहरापासुन जवळ, किल्ल्य़ावर पोहचता येण्य़ाचे सुकर हमरस्ता आणि तेथे असणारे पर्यटन! पण आपण करीत असलेल्या किल्ल्यांना हे लाभलेले नाही.

अश्या कामांमध्ये सर्वात मोठे कोणते आव्हान असेल तर आर्थिक मदतीचे!! संवर्धनाचे काम शहरापासुन लांब आणि कित्येक पट उंचीवर असल्याने ह्या कामात येणारा खर्च चौपट असतो. किल्ल्यावर १० हजार रू. संवर्धन साहित्य पोहचवयास संस्थेला ८०  ह्जार रुपये लागले आहेत ही वस्तू स्थिती आहेत. तिकोनावर देऊळाचे छत दुरुस्तीसाठी त्याकिल्ल्यावर नेहमी येणारय़ा एका संस्थेने बांधकामसाहित्यासाठी आर्थिक मदत केली पण श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ह्या सहित्याचा वाहतुक खर्च वाचावा आणि उपलब्ध निधी जास्तितजास्त किल्ल्यावर वापरता यावा ह्याकरीता स्वत: ते साहित्य डोक्य़ावरुन वाहुन न्हेऊन काम पुर्णत्वास नेले! हे सत्य आहे. आजमितीस संस्थेने कित्येक लोकांना, छोटे-मोठे उद्योगधंदे असणारे व्यक्तींना उद्देश पटवुन दिल्याने आणि त्याच प्रकारचे काम करून दाखवल्याने संस्थेल मासिक वर्गणीदार आणि देणगीदार जोडता आले आहेत. संस्था आज इ.सि.एस. (ECS) पद्धतीने मासिक वर्गणी आपल्या सभासदांकडुन जमा करते. पण कामाचा आवाका जसजसा वाढतो तसे हे उपलद्ध निधी कमी पडत आहे असे बरय़ाचदा जाणवते.
ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, जनजागृती आणि माहिती प्रसारण. जनसामान्यांना ह्या चळवळीमध्ये सामिल करून घेण्यासाठी आपला हेतू त्यांच्यापर्यंत पोहचवण्य़ा करीता वृत्तपत्र, इंटरेनेट अशी माध्यमे महत्वाचा वाटा आहे. आजमितीला प्रत्येक तरूणाच्या हाती मोबाईल आणि त्यावरुन संपर्क साधता येतील अशी सोशल साईट माध्यमे आहेत. आपल्या संस्थेचा हेतू संकेस्थळाच्या (Website) माध्यमातून अनेक संस्था वापर करत आहेत. पण त्यातुन अश्या उपक्रमांमध्ये सामिल होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. एखाद्या वेळेस केलेल्या आवाहनाला लोकांचा प्रतिसाद मिळेल पण त्यांच्या पुढील कामांसाठी हेच सातत्य राहिल ह्याची शाश्वती नसते. ह्यासाठी सर्व संस्थानी एकत्रितरित्या सुयोग्य मार्ग शोधला पाहिजे. वृत्तपत्रे ह्यात मोलाचा सहकारी पण प्रत्येक वेळेला ह्यांचा प्रतिसाद मिळेल असे मानता येत नाही. बरेच वृत्तपत्रे ज्याभागात काम चालू आहे त्या भागातील पुरवणी मध्ये ह्या कामाची बातमी दिली जाते. त्यामुळे सर्वदुर बातमी जात नसल्याने बरेच उत्साही लोक अश्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे श्रेय त्यांना मिळत नाही. वृत्तपत्र जसे समजाचा आरसा आहे तसेच संवर्धनाच्या कामात कार्यरत असणारय़ा संस्थांचा सुद्धा आरसा बनावा अशी इच्छा आहे.

कळावे,
श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, पुणे.
॥ ऐतिहासिक वास्तुंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील॥
WWW.Shivdurg.org
WWW.Facebook.com/shivdurg

Tuesday, June 30, 2015

"दुर्गराज राजगड"

राजांचा गड म्हणून आपल्याला माहित असलेला किल्ला म्हणजे "दुर्गराज राजगड". या किल्यांने छत्रपती शिवाजी महाराजांना जवळून पाहिले. स्वराज्याच्या चढता आलेख या किल्याने अनुभवलाही!!! जर दगडांना, डोंगरदरी, तटबुरुज यांना मृत्यू असता तर यांनी चित्रगुप्ताला अभिमानाने सांगीतले असते आम्हाला स्वर्ग नको कारण आम्ही आमच्या जीवनात छत्रपतींचा स्पर्श आणि सहवास अनुभवलाही याहून मोठे आम्हास स्वर्गात ते काय मिळणार!!! 🙏

पणं या किल्याची आजची परिस्थिती पहाता आपणं खुप कृतघ्नपणाची सिमा गाठली असे वाटते. आपणं जयजयकारातच आडकुन पडलो आहे असे भासते.

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेने राजगडावर २०१० सालापासून या किल्यावर संवर्धनासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. एक एक महिन्यात किल्यावरील विविध वास्तूंना पूर्नउजेडात आणण्यास सुरवात झाली. पाली मार्गातील २५४+ पायारी असो की पद्मावती माचीवरील वाड्यांची जोती, पाण्याचे स्त्रोत किंवा बुरुजांची स्वच्छता करण्यात आली.
       

 २०१२ सालात संस्थेने बालेकिल्यावरील वास्तूंच्या संवर्धनाकडे आपला मोर्चा वळवला. बालेकिल्याची स्वच्छता करताना बरयाच वास्तू स्वच्छ करण्यात आल्या. अंबारखाना, बाजारपेठे सारखे असणारे लागून असलेली वाडे स्वच्छ करण्यात आले.

      या संदेशांबरोबर जोडलेली छायाचित्र आपल्याला नक्कीच कामाचा आढावा देईल. अशा मोहिमात आपल्यासारख्या लोकांचा सहभाग असावा आणि ही दुर्ग संवर्धनाची चळवळ पुढे जावी या उद्देशापोटी हा लेखन प्रपंच!

बहुत काय लिहणे आपणं सुज्ञ असा!!!!


आपला,
योगेश फाटक.
मो. +९१-९८२३३००७२४.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील।।
http://www.shivdurg.org/
https://www.facebook.com/shivdurg/

Saturday, June 27, 2015

हीच आपली संस्कृती आहे काय?

नमस्कार,



भिंतीवर प्रेमिकेचे नाव टाकयची ज्यांना हौस आहे
त्यांनी त्यांच्या घरावर खुशाल टाका.
गडकिल्ल्यांच्याभिंतीवर नको...
ज्याच्या प्रेयसीचे नाव गडकोटावर दिसेल ती प्रेयसी
सार्वजनीक मालमत्ता समजली जाईल..
🚫
Forward fast..

एक कट्टर शिवभक्त ⛳



सकाळी सकाळी हा मेसेज पाहिला आणि मन उद्विग्न झाले. कट्टर शिवभक्त म्हणणारा हा व्यक्ती ना छत्रपती शिवाजी महाराजांना समजला ना स्त्रियांना!!!!

असे म्हणण्याचे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीच्या वेळी स्त्रियांच्या संदर्भात अनेक प्रसंग उद्भवले. याचेच एक उदाहरण म्हणजे 'राझ्याच्या पाटिलाल सुनावलेली शिक्षा' शिवाजी महाराजांची न्यायबुद्धी आणि स्त्रियांच्या बद्दल असलेला आदर दाखवतात.

मुळात प्रेमिकांनी अशी नावे कोरणे ही निंदनीय प्रथा जगभर दिसते. मी अगदी न्यूयॉर्कला असताना, ऐंपायर स्टेट बिल्डिंगच्या ८८व्या माळ्यावर मी स्वतः पाहिले आहे. पिरामिड पाहिलेली व्यक्ती सुद्धा तिथे अशी नावे लिहलेली आहेत असे म्हणतात.

आता थोडे वळुयात आपल्या किल्याच्यांवर मजनू लोकांनी लिहलेली नावे. ही बाब सुद्धा नक्कीच निंदनिय आहे. ज्याकिल्यांचे स्वामित्व असलेल्या व्यक्तीने आपले नाव लिहले नाही तिथं असे आपल्या प्रेमाच्या खुणा सोडणे म्हणजे कृतघ्नपणाचे लक्षण आहे.


मुळात हा असा मेसेज प्रसरुत करण्याच्या डोसक्यात भुस्सा भरलेला आहे का असं वाटते. कारण ज्या मुलिचे नाव आहे तिला सार्वजनिक मालमत्ता म्हणणे म्हणजे तालिबानी असण्याचे द्योतक आहे. युद्धात जिकंल्यानंतर प्राप्त होणारी वस्तू आणि व्यक्ती वाटून घेणारे आपण अब्दाली आहात काय?

हीच आपली संस्कृती आहे काय?

 युद्धात जिंकल्यानंतर शत्रूंच्या साधारण / असाधारण स्त्रियांना मानाने वागवणारे आपले छत्रपतींची शिकवणुक विसरले का? हा प्रश्न निर्माण होतो. या मेसेजमध्ये स्त्रीयांबरोबर आपल्या राज्याचा अपमान केला आहे असे वाटते. दुसरी गोष्ट असे मजनू एकतर्फी प्रेमातुन लिहणारे असतात, यामध्ये मुख्यतः त्या स्त्री व्यक्तीला याची कल्पना सुद्दा नसते. त्यामुळे तीला संप्पत्ती ठरवणार???

यामेसेजमध्ये कट्टर शिवभक्त म्हणवणारा ना राज्यांना समजला ना स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाला.
असे नावे लिहण्याचे प्रकार किल्ला काय पण शहरात गावात सुद्धा दिसतात, यामध्ये मुख्यतः त्या स्त्रीला बदनाम करणे हा हेतू असतो.

त्यामुळे अशा शिवभक्तांची गरज आहे का? स्त्रियांना मालमत्ता मगं ती वैय्यतीक असो सार्वजनिक समजणारे हे नक्कीच शिवभक्त नव्हेत.

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेने जोडलेले लोक अशा समस्येवर तोडगा म्हणजे ती लिहलेली नावे खोडण्यासाठी ब्रश, पाणी आणि साबण घेऊन ती खोडण्यासाठी प्रयत्न करतात. माझ्या दृष्टीने हे खरे कट्टर शिवभक्त. अशा व्यक्तींनी किल्ले तिकोना, रोहिडा, राजगडावर मोहिमा घेऊन स्वच्छता केली आहे. चुन्यापासुन अगदी आॅईल पेंटने रंगवलेली नावे काढण्यात आली. यासाठी चिंचेचा कोळ वापरण्यात आला. तसेच काॅस्टिक सोडा वापरून न जाणारे रंग काढण्यात आले आहेत. (काॅस्टिक सोडा वापरण्याच्या पद्धती आहेत. त्याचा वापर करण्याआधी कृपया जाणकारांचे मत घ्यावे. सगळीकडे हे वापरावे लागतेवासे ही नाही.)


आपणं ठरवा कोणत्या प्रकारातील शिवभक्त व्हावे!!



आपला,
योगेश फाटक.
मो. +९१-९८२३३००७२४.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील।।
http://www.shivdurg.org/
https://www.facebook.com/shivdurg/

Saturday, June 13, 2015

रोहिडा गडाला हिरव्या शालूने अलंकारीत करणे

नमस्कार,


वार  शनिवार                                      स्थळ रोहिड गड



मोहिम :  रोहिडा गडाला हिरव्या शालूने अलंकारीत करणे व गडावर काम करणाऱ्या लोकांना गादी वाटप तसेच त्यांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करणे.


सहभागी कार्यकर्ते: योगेश फाटक, महेश नेलगे, मुदगल काका, अमोल हळबे, निलेश वडके, पैठणकर, दर्शन वाघ, व नविन कार्यकर्ते ठाकुर व मिसाळ

काल गडावर, व्रुक्षारोपणाच्या मोहिमेअंतर्गत जास्वंद, बहाव, परिजातक कदंब अशा एकुण 26 झाडांना त्यांची हक्काची जागा मिळवुन देण्याच्या कामी वरील सर्व कार्यकर्त्यांनी आपला कार्याचा वाटा उचलला, संस्थेच्या बरोबरीने वन खात्यानेही मुलाणी साहेब व त्याचे 6 गार्ड यांच्या मार्फत आपला सहभाग नोंदविला.
आपले सर्व गडपाल व गडावर काम करणारे सर्व कामगारही उपस्थित होतेच.
 का कोणास ठाऊक पण आपली संस्धा आणि वनखाते एकत्र येवून गडाला हिरव्या शालूने नटवतायत म्हटल्यावर सुर्य देवानेही आपला लाल रंग रोखून धरत देवदेवतांचा सहभाग नोंदविला.

याच बरेबरीने नक्षत्रवनातील जी वृक्षराजी आपण गेल्या वर्षभरापासून संभाळत आहोत, जोपासत आहोत, त्यांचे नामकरण तर फार पुर्वी नारद पुराण काळीच झाले आहे, पण त्याचा औपचारीक सोहळा काल पार पडला.

तसेच गडावरील इतर कामे, त्यांचे पाऊस काळातील नियोजन, गडावर सापडलेल्या वस्तूंची यादी तयार करणे, वनखात्याशी पुढील कामांबाबत चर्चा आदि कामातही सर्व उपस्थितांचा सहभाग लक्षणिय होता.

याच बरोबरीने एक कृतज्ञता म्हणुन गडावर काम करणाऱ्या कमगारांच्या मुलांसाठी शालेय साहीत्य वाटप व याच कामगारांना गडावर कष्ट करुन, थकून भानगु घरी आल्यावर विसाव्याचे साधन म्हणून गादी व उशी वाटपाचा कार्यक्रमही संस्थेने सोहळारुपी पर पाडला. गडावर शालेय सहित्य, वनखात्याचे श्री मुलाणी साहेब यांच्या हस्ते वाटण्यात आले, तर खाली आल्यावर गावातील देवादिकांच्या साक्षीने (मंदिरासमोर) सरपंचाच्या हस्ते गाद्या वाटपाचा कर्यक्रम संपन्न जाहला.

सर्व उपस्थित सभासद, गडकरी/गडपाल, वन खात्याचे कर्मचारी यांचे .

सकल चराचराला उजळविणाऱ्या सुर्यनारायणाचे व आमच्या भावभावना व बुद्धीचा ओढा गडाकडे नेणाऱ्या सर्व देवदेवतांचा ऋणी.

काही क्षणचित्रे....



आपला,
दर्शन वाघ.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे.
॥ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील॥
http://www.shivdurg.org/
https://www.facebook.com/shivdurg/

Sunday, May 31, 2015

शिवराज्याभिषेक दिन - ३१ मे २०१५

नमस्कार,



शिवराज्याभिषेक दिन म्हणजे एक वेगळी अनुभुती देणारी दिवस!!! रायगडावर जाऊन अनेक उत्साही मंडळीच्या समवेत अापल्या राज्याला ३५० वर्षांनंतरसुद्धा सिंहासनाधिश्वर होताना पहाताना छाती अभिमानाने फुलुन जाते.


पणं ज्या किल्यांच्यासाथीने हे हे अवघे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले त्यांवर असे दिन साजरे होतांना दिसत नाही. ज्यांना रायगडी आपली सेवा रूजू करता येत नाही त्यांनी आपल्या भागातील किल्यावर असे दिन साजरे केले पाहिजे या हेतुने श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेने ३१ मे २०१५ रोजी रोहिडा दुर्गावर राज्याभिषेक सोहळा साजरा केला.


यामध्ये मुख्यत्वे रोहिडा किल्याजवळील रामोशी वाडीमधिल तरुण लोकांनी पुढाकार घेतला. त्यांना साथ मिळाली ती मानकरवाडी, बाजारवाडी मधील तरूणांची!!! किल्यावर ७० लोकांनी रोहिडमल्लला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक घालुन किल्यावर राज्यांची पालखी मिरवली. हा एक अविस्मरणीय क्षण होता. सर्वजण एकमुखाने जयजयकार करीत दिन साजरा झाला!

रायगडा बरोबर आपल्या इतर किल्यावर सुद्धा असे दिन साजरा करूयात कारण भाग्यवान जरी रायगड असला तरी त्याचे भाग्य हे आपल्या इतर किल्यांनी लिहलयं!!!!



आपला,
योगेश फाटक.
मो. +९१-९८२३३००७२४.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील।।
http://www.shivdurg.org/
https://www.facebook.com/shivdurg/

Saturday, May 30, 2015

अहवाल लेखन
खुपदा लोक विचारतात आपणं कशाप्रकारे आणि कोणकोणत्या कामांचे संकलन करुन अहवाल (Reports)  बनवता? 

संस्था ज्या किल्यावर कामे करिते त्यासर्वांचे विस्तृत माहीती देऊन अहवाल बनवते. किल्यावर येणारा खर्च, मोहिमेचे स्वरुप, केलेल्या कामांची माहीती; अशा विविध गोष्टींचे संकलन अहवालात असते. 

यापोस्ट बरोबर जोडलेली छायाचित्रे आपल्याला जास्त माहीती देतील.

आपला,
योगेश फाटक.
मो. +९१-९८२३३००७२४.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील।।
http://www.shivdurg.org/
https://www.facebook.com/shivdurg/

Friday, May 22, 2015

भोर विभागाचे वन अधिकारी

                 श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.  कधी पुरस्काराच्या स्वरूपात तर कधी वस्तू रुपी दान देऊन, तर कधीतरी पाठीवर कौतुकाची थाप देऊन.
आज संस्थेने स्वयंम स्फुर्तीने तयार झालेले सभासद, देणगीदार छोट्या / मोठ्या औद्योगिक संस्था यांच्या माधम्यातुन या दुर्ग संवर्धन चळवळीसाठी लोक जोडले आहेत. तशाच प्रकारे शासनाशी सुसंवादाच्या माध्यमातून आम्ही माणसे जोडली आहेत. याची प्रचीती म्हणजे भोर विभागाचे वन अधिकारी
श्री. दिलीप झगडे साहेब यांनी संस्थेला ५०००₹ ची देऊ केलेली आर्थिक मदत.

रोहिडा किल्यावर कामाच्या परवानगी आणि केलेल्या कामाची माहिती देण्याच्या उद्देशाने आम्ही कायम यांना भेटतो. वन विभागात काम करत असताना त्यांच्या अनुभवाचा आम्हाला कायमच मदत झाली. नैसर्गिकरित्या लागलेला वणवा आटोक्यात कसा आणावा हे एक उदाहरणच म्हणून घ्याना!!!
कधी आमचा दृष्टीतून निसटलेली बाब सुद्धा अगदी साध्या शब्दात आम्हाला सागतात.

सध्या भोर वन खात्याने रोहिडा किल्यावरील विविध आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या कामांना हात घातला आहे. त्यातून शासनाची ताकद काय असते याची प्रचिती सध्या किल्यावर चालू असलेल्या कामांच्या परिस्थितीतुन तुम्हाला अनुभवता येईल. तसे आजुन कोणत्या स्वरूपाची कामे हे खाते काम करू शकेल या दृष्टीने संस्थेने सदर विभागाला रितसर पत्र देऊन कामांची यादी देऊ केलेली आहे.



याचे औचित्य साधुन मला सगळ्यांना सांगावसे वाटते की, अशा विविध स्तरातून मिळत असलेल्या मदतीने आमचा आत्मविश्वास द्वीगुणीत झाला आहे.



श्री शिवदुर्ग संस्थेतर्फे श्री. झगडे साहेबांचे खुपखुप आभार.


आपला,
योगेश फाटक.
मो. +९१-९८२३३००७२४.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील।।
http://www.shivdurg.org/
https://www.facebook.com/shivdurg/